स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये नाशिकचा नंबर लागला हि खऱ्या अर्थाने महत्वाची गोष्ट आहे. परंतु, स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा विकास खऱ्या अर्थाने होणार का? हे बघावं लागेल. स्मार्ट सिटीच वार सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहताना दिसतं. परंतु, स्मार्टसिटी संकल्पना समजावून घेऊन त्यावर विचार व्हायला हवा. केंद्र सरकार स्मार्टसिटीच्या नावाखाली फक्त आपल्या पक्षाचं नाव व्हावं, हे तर बघत नाही ना? हा संशय देखील येतो.
ते काहीही असो पण शहरामध्ये वाहत असलेलं स्मार्ट सिटीच वारं आणि नागरिकांमध्ये असलेली समाधानाची भावना लक्षात घेता, केंद्र सरकारची हि योजना सफल होवो व आजपर्यंत वीज, पाणी, रस्ते इ. मूलभूत गोष्टींपासून वंचित असणाऱ्या नागरिकांना त्या मिळो व एक तरी शहर स्मार्ट बनून आदर्श ठरावं हीच अपेक्षा सर्वजण करताना दिसतात. आज सरकारची प्रतिमा फेकू अशा स्वरूपाची झालेली दिसते. निवडणुकांच्या तोंडावरती मोठ मोठ्या घोषणा करणे आणि नंतर त्याचा विसर पडणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतायेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजना तरी सफल होऊन देशाला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतील कि नाही याकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. आज भटकंती मध्ये हा विषय फिरताना महत्वाचा वाटला म्हणून बोलतो आहे.
नाहीतर आपलं नेहमीच आहेच, रस्ता ओलांडताना वृद्ध गृहस्थांना दुचाकीस्वाराने उडवले... आजोबा गंभीर जखमी.... शहरामध्ये घाणीचे साम्राज्य.... जनता हैराण.... लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड हलवण्याची मागणी.... सिडको भागात अनियमित पाणीपुरवठा.... वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली न गेल्याची नागरिकांची तक्रार.... शहरातील काही नवीन सिडको भागात अंधाराचे साम्राज्य. अंधारामुळे महिलांना रात्री घराबाहेर निघणे मुश्किल.... या आणि अशा अनेक बातम्या रोज पेपरला वाचतो. त्यामुळे स्मार्ट सिटी द्वारे या समस्या तरी लवकरात लवकर सुटाव्यात व शहर स्वच्छ व मूलभूत गोष्टींनी समृद्ध व्हावं हीच अपेक्षा..... धन्यवाद.
ते काहीही असो पण शहरामध्ये वाहत असलेलं स्मार्ट सिटीच वारं आणि नागरिकांमध्ये असलेली समाधानाची भावना लक्षात घेता, केंद्र सरकारची हि योजना सफल होवो व आजपर्यंत वीज, पाणी, रस्ते इ. मूलभूत गोष्टींपासून वंचित असणाऱ्या नागरिकांना त्या मिळो व एक तरी शहर स्मार्ट बनून आदर्श ठरावं हीच अपेक्षा सर्वजण करताना दिसतात. आज सरकारची प्रतिमा फेकू अशा स्वरूपाची झालेली दिसते. निवडणुकांच्या तोंडावरती मोठ मोठ्या घोषणा करणे आणि नंतर त्याचा विसर पडणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतायेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजना तरी सफल होऊन देशाला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतील कि नाही याकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. आज भटकंती मध्ये हा विषय फिरताना महत्वाचा वाटला म्हणून बोलतो आहे.
नाहीतर आपलं नेहमीच आहेच, रस्ता ओलांडताना वृद्ध गृहस्थांना दुचाकीस्वाराने उडवले... आजोबा गंभीर जखमी.... शहरामध्ये घाणीचे साम्राज्य.... जनता हैराण.... लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड हलवण्याची मागणी.... सिडको भागात अनियमित पाणीपुरवठा.... वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली न गेल्याची नागरिकांची तक्रार.... शहरातील काही नवीन सिडको भागात अंधाराचे साम्राज्य. अंधारामुळे महिलांना रात्री घराबाहेर निघणे मुश्किल.... या आणि अशा अनेक बातम्या रोज पेपरला वाचतो. त्यामुळे स्मार्ट सिटी द्वारे या समस्या तरी लवकरात लवकर सुटाव्यात व शहर स्वच्छ व मूलभूत गोष्टींनी समृद्ध व्हावं हीच अपेक्षा..... धन्यवाद.
Great
ReplyDelete